Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Sunday, October 4, 2020

101 वर्ष रयतेची ..

रयतेची शतकोत्तर वाटचाल...!
    शिवछत्रपतींनी दीनदुबळ्या लोकांसाठी 'रयत' हा शब्द योजला, त्याच शब्दाचा पुनरुच्चार करीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, तिला आज १०१ वर्षे पूर्ण होत आहेत.देशात कोणतेही शैक्षणिक धोरण नसताना स्वातंत्र्यापुर्वी रयतची स्थापना झाली होती,तदनंतर पन्नास वर्षानी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. त्यामुळे देश व राज्य सुसंस्कृत व साक्षर करण्यात रयतचे योगदान असून महाराष्ट्रातील जनता ते कधीच विसरू शकणार नाही..
     लॉर्ड मेकॉलेच्या सिद्धांतानुसार, महाराष्ट्रात  शिक्षण संस्था शहरात सुरू होत असतानाच कर्मवीरांनी 'काले' या ग्रामीण भागात शिक्षण आरंभ करून देशात ग्रामीण क्रांतीची ज्योत पेटवली.
     ७३७ शाखा, पंधरा हजार सेवक व साडेचार लाख विद्यार्थी सध्या रयत मध्ये असून गेल्या शंभर वर्षांपासून हा 'ज्ञानयज्ञ' अव्याहतपणे सुरू आहे. सध्या रयत प्रवाहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक कोटीहून अधिक लोक असून  न्युझीलंड,ऑस्ट्रिया,स्वीडन या देशांची लोकसंख्या देखील एक कोटीहून कमी आहे,म्हणून रयत ही आशिया खंडात प्रथम क्रमांकाची संस्था मानली जाते.
    सध्या रयतचे वार्षिक बजेट दहा अब्ज पन्नास कोटी रुपये एवढे असून ते मागील काही दिवसांपूर्वी गोवा राज्याच्या बजेटच्या जवळपास होते!
     महाराष्ट्रात रयतने पहिली कृषी शाळा धनिणीच्या बागेत सुरु केलीच, पण आजही १६७२ एकर रयतचे शेतीक्षेत्र आहे, देशातील पहिले महिला डीएड कॉलेज काढून महाराष्ट्रातील मुलींना शिक्षिका करण्याचे महान कार्य रयतनेच केले.देशाच्या स्वातंत्र्यात,गोवा मुक्तिसंग्रामात रयतने मोलाचे योगदान दिले आहे.कर्मवीरांची इच्छा होती की,'रयत विद्यापीठ'व्हावे तिची पूर्तता पूर्ण होत आहे याचा आम्हा सर्वांना अत्यानंद होतोय!!
     आधुनिक शिक्षण देण्याकरिता रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार देखील केलेले आहेत.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड,लुपिन लिमिटेड, टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेस,द लीडर्स इन इंडस्ट्री, एस एन एस फाउंडेशन, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स, जैन इरिगेशन सिस्टीम, फाली यांसारख्या संस्थांशी रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार केलेले आहेत.
        ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षण तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहे. कर्मवीर अण्णा नेहमी म्हणत, "जोपर्यंत समाजाला गरज आहे तोपर्यंत माझी रयत समाजाच्या उत्कर्षासाठी काम करेल" ही त्यांची घोषणा खऱ्या अर्थाने त्यांच्या पश्चातही सार्थ ठरत आहे

(संदर्भ - युगप्रवर्तक कर्मवीर पुस्तकातून...)

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"