Menubar

अभिनंदन!! अभिनंदन !! अभिनंदन!! ✌🌹🥇🥇🥇🏆🏆 ⚜ रयत शिक्षण संस्थेचे, ⚜ न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल. ⚜ 💐💐💐💐💐💐💐💐 NMMS परीक्षा निकाल 2024 ✌💐💐🏆🥇🥇💐💐 !!! या वर्षी उत्तुंग यश !!! 💫 एकूण परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी - 47💫 ⭐ परीक्षेत पात्र विद्यार्थी - 30 💫 NMMS शिष्यवृत्ती धारक 2-विद्यार्थी 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक - 16 विद्यार्थी 🥇🥇🥇2 विद्यार्थ्यांना 60,000 रुपये प्रमाणे 1,20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार🥇🥇🥇 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी - 16 प्रति विद्यार्थी 38,400 रुपये प्रमाणे 6,14,400/रुपये शिष्यवृत्ती मिळणार.🏆👍👍👍 🥇🥇🏆🏆 एकूण 7,34,400/रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार🏆🏆🥇🥇 NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी ⭐ पाटकर रोहन अंकुश ⭐ कांबळे रोहन शंकर सारथी शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी - 16 ⭐ सरवळे प्रसन्न प्रशांत ⭐कु. जाधव प्रणाली काकासाहेब ⭐ कु.गायकवाड प्रशाली केराप्पा ⭐ पवार यश विजय ⭐ साळुंके सूर्यन संजयकुमार ⭐ जाधव समर्थ रामचंद्र ⭐क्षीरसागर शंभुराजे अविनाश ⭐ अवताडे प्रज्वल संभाजी ⭐ कु. घोडके समृद्धी हरिश्चंद्र ⭐ कु.जाधव जुई संजय ⭐ताड आदर्श बाळू ⭐ निकम प्रणव परमेश्वर ⭐ घोडके सुमित नितीन ⭐जाधव ओम संतोष ⭐ झिंजुर्डे मंथन मोहन ⭐ कु.साळुंखे संस्कृती समाधान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐 विभाग प्रमुख - श्रीमती. सुर्वे पी ए. सौ. माने एस. एम., श्री. खाडे व्ही. एन, श्री. बिराजदार ए. ए., श्री. बोईनवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक मा. श्री. मदने जे. पी., गुरुकुल विभाग प्रमुख श्री. खरात एन आर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल कुरूल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती कुरूल पंचक्रोशीतील सर्व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले 🏆🏆🥇🥇🥇🏆🥇🥇🥇🥇✌✌💐

Sunday, October 4, 2020

101 वर्ष रयतेची ..

रयतेची शतकोत्तर वाटचाल...!
    शिवछत्रपतींनी दीनदुबळ्या लोकांसाठी 'रयत' हा शब्द योजला, त्याच शब्दाचा पुनरुच्चार करीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, तिला आज १०१ वर्षे पूर्ण होत आहेत.देशात कोणतेही शैक्षणिक धोरण नसताना स्वातंत्र्यापुर्वी रयतची स्थापना झाली होती,तदनंतर पन्नास वर्षानी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. त्यामुळे देश व राज्य सुसंस्कृत व साक्षर करण्यात रयतचे योगदान असून महाराष्ट्रातील जनता ते कधीच विसरू शकणार नाही..
     लॉर्ड मेकॉलेच्या सिद्धांतानुसार, महाराष्ट्रात  शिक्षण संस्था शहरात सुरू होत असतानाच कर्मवीरांनी 'काले' या ग्रामीण भागात शिक्षण आरंभ करून देशात ग्रामीण क्रांतीची ज्योत पेटवली.
     ७३७ शाखा, पंधरा हजार सेवक व साडेचार लाख विद्यार्थी सध्या रयत मध्ये असून गेल्या शंभर वर्षांपासून हा 'ज्ञानयज्ञ' अव्याहतपणे सुरू आहे. सध्या रयत प्रवाहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक कोटीहून अधिक लोक असून  न्युझीलंड,ऑस्ट्रिया,स्वीडन या देशांची लोकसंख्या देखील एक कोटीहून कमी आहे,म्हणून रयत ही आशिया खंडात प्रथम क्रमांकाची संस्था मानली जाते.
    सध्या रयतचे वार्षिक बजेट दहा अब्ज पन्नास कोटी रुपये एवढे असून ते मागील काही दिवसांपूर्वी गोवा राज्याच्या बजेटच्या जवळपास होते!
     महाराष्ट्रात रयतने पहिली कृषी शाळा धनिणीच्या बागेत सुरु केलीच, पण आजही १६७२ एकर रयतचे शेतीक्षेत्र आहे, देशातील पहिले महिला डीएड कॉलेज काढून महाराष्ट्रातील मुलींना शिक्षिका करण्याचे महान कार्य रयतनेच केले.देशाच्या स्वातंत्र्यात,गोवा मुक्तिसंग्रामात रयतने मोलाचे योगदान दिले आहे.कर्मवीरांची इच्छा होती की,'रयत विद्यापीठ'व्हावे तिची पूर्तता पूर्ण होत आहे याचा आम्हा सर्वांना अत्यानंद होतोय!!
     आधुनिक शिक्षण देण्याकरिता रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार देखील केलेले आहेत.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड,लुपिन लिमिटेड, टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेस,द लीडर्स इन इंडस्ट्री, एस एन एस फाउंडेशन, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स, जैन इरिगेशन सिस्टीम, फाली यांसारख्या संस्थांशी रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार केलेले आहेत.
        ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षण तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहे. कर्मवीर अण्णा नेहमी म्हणत, "जोपर्यंत समाजाला गरज आहे तोपर्यंत माझी रयत समाजाच्या उत्कर्षासाठी काम करेल" ही त्यांची घोषणा खऱ्या अर्थाने त्यांच्या पश्चातही सार्थ ठरत आहे

(संदर्भ - युगप्रवर्तक कर्मवीर पुस्तकातून...)

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"