Menubar

🏆 *!!!अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!!* 🏆 *रयत शिक्षण संस्थेचे,* *न्यू इंग्लिश स्कूल कुरुल,* *ता. मोहोळ, जि. सोलापूर.* 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 *NMMS परीक्षा शिष्यवृत्ती अंतरिम* *निकाल जाहीर सन 2025-26* *!!!! विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम!!!!* *NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी-06* 🥇🥇 *06 विद्यार्थ्यांना 48,000 रू प्रमाणे = 2,88,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.*🥇🥇 🏆🥇🥇🥇💐✌️👍👍 ✌️✌️ *NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी* *1) कु. साक्षी नागेश वाघमारे* *2) कु. यशस्वी पोपट जाधव* *3) श्रेयस संभाजी धर्मशाळे* *4) कु.प्रज्ञा धर्मा ननवरे* *5) वैष्णव श्रीरंग लामतुरे* *6) कु.राधा लहू रोमन* 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶 *या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना* *विभाग प्रमुख तथा बुद्धिमत्ता विषयशिक्षिका:- सौ.शेटे पी.पी मॅडम* *सा.शास्त्रे विषयशिक्षक:- श्री.तांबोळी एस.यू सर,* *विज्ञान विषयशिक्षक:- श्री खाडे व्ही.एन सर* *गणित विषयशिक्षक:- श्री पवार बी.व्ही सर,* *यांचे मार्गदर्शन लाभले .* ✌️✌️✌️🏆🏆🏆 🏵️ *सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री चंद्रकांत दळवी साहेब,संस्थेचे संघटक मा.डॉ.अनिल पाटील साहेब,रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे चेअरमन माननीय श्री संजीव पाटील साहेब,सचिव मा.श्री विकास देशमुख साहेब,सहसचिव मा.श्री बंडू पवार साहेब,विभागीय अधिकारी श्री एन.आर जगदाळे साहेब,सहाय्यक विभागीय अधिकारी श्री एन.टी निकम साहेब व श्री डी.बी दाभाडे साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब देशमुख साहेब,पर्यवेक्षक श्री भानुदास घार्गे साहेब,शालेय स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन समिती, विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कुरुल पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले.* 🏆🏆🏆✌️✌️✌️💐💐💐🌹🌹🌹

Saturday, November 5, 2016

क्षणापासून मनापर्यंत

पुढच्या क्षणी आपण असू की नसू याची खात्री माणसाला देता येत नाही. तरीही तो आपल्या भविष्याविषयी चिंताग्रस्त, आपल्या कर्तृत्वाविषयी तणावग्रस्त आणि आपल्या प्रॉपर्टीविषयी भयग्रस्त स्थितीत का असतो, हे लक्षात येत नाही. या तिन्ही दिशांनी त्याचे लक्ष सतत विचलित केल्याने हाती घेतलेले कोणतेही काम तो नीट पूर्ण करू शकत नाही. त्याने खरी काळजी घेतली पाहिजे ती आजच्या दिवसाची, हातातल्या कामाची, आत्ताच्या क्षणाची. या क्षणी जर तो शरीराने आणि मनाने सक्षम असला तरच जगण्याचा आनंद व्यवस्थित घेऊ शकतो आणि हातातील कामही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो.
एक आजीबाई आयुष्यात प्रथमच पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाल्या. जाण्यापूर्वी आपले सारे दाग-दागिने एकत्र करून त्यांनी ते गाठोडे शेजारणीकडे ठेवले. पण त्या जसजशा पंढरीच्या दिशेने पुढे सरकत होत्या तसतसे त्यांचे मन त्या गाठोड्याच्या दिशेने मागे मागे जात होते. आपले दागिने चोरीला गेले तर आपले पुढे काय होईल या भीतीने त्या इतक्या ग्रस्त होत्या की पांडुरंगाच्या जागी त्याना ते दागिन्यांचे गाठोडेच दिसायला लागले.
असेच एक सद्गृहस्थ आजारी वडिलांना भेटण्यासाठी ट्रेनमध्ये बसून निघाले होते. ते इतके टेन्शनमध्ये होते की बसताना ते आपली बॅग डोक्यावर घेऊन बसले. शेजारी म्हणाला, बॅग वर किंवा पायाखालच्या जागेत ठेऊ शकता. त्यावर ते सद्गृहस्थ काय म्हणतात? माझे तिकीट काढले आहे; बॅगेचे नाही! बॅग डोक्यावर ठेवल्याने त्यांचे टेन्शन कमी कसे होणार होते हे त्या पांडुरंगालाच ठावे.
विचलित न होता हाती घेतलेल्या कामात पूर्णपणे बुडून जाणारा किंवा चालू क्षणांना आनंदाने सामोरे जाणारा माणूस आपोआप यशाच्या मुक्कामी पोहोचतो. विद्यार्थी असो, खेळाडू असो, चित्रकार असो, गायक असो, शिक्षक असो वा आणखी कोणी असो, कामात पूर्ण लक्ष घातले की तो यशस्वी होणार हे नक्की. बर्फ जसा पाण्यात विरघळतो किंवा तेल आणि वात जसे पूर्णपणे एकरूप होऊन प्रकाश देण्याचे काम करतात, तसे माणसाने कामाशी एकरूप झाले पाहिजे.
आजीबाईनी गाठोड्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे किंवा त्या गृहस्थाने डोक्यावरचे ओझे खाली उतरून ठेवणे आवश्यक होते. आजीबार्इंनी विठ्ठलाचे नामस्मरण करत राहणे आणि त्या गृहस्थाने वडिलांना आराम पडावा म्हणून औषधोपचारांचे नियोजन करत, सद्भावनांचे वलय विस्तारत ठेवणे अधिक महत्वाचे होते.
-प्रल्हाद जाधव

No comments:

Post a Comment

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"